जीवन हा एक प्रवास
आणि आपण प्रवासी
त्या वाटेवरचे कधी सुखाचा उतार
तर कधी दु:खाची चढण
थोडी कमी जास्त
पण प्रत्येकाच्या वाट्याला येणारी
अगदी न चुकता,
हा प्रवास कधीही न संपणारा संपतो
फक्त मृत्यूच्या दारात,
मग हा खटाटोप कशासाठी
सुखाची हिरवळ शोधण्यासाठीच ना,
पण सुख तर एक मृगजळ,
कधीही हाती न येणारे
आणि या मृगजळाचे बनलेच पाणी
तर कधीही तृप्त न होणारे
मग सुख म्हणजे तरी काय,
जे दु:ख नाही तेच तर ना
ज्याचे अस्तित्व पाण्याच्या बुडबुड्यासारखं,
क्षणिक मिळवू का आपण कधी सुख ?
जर असाच पाठलाग करत राहिलो
तर पाहूया ना प्रत्येक दु:खाला आपलसं करुन,
पाहूया ना प्रत्येक दु:खाला सहानुभूतीने
नक्कीच सापडेल त्यांत आपलं सुख
शेवटी मानल तरच सुख ना ? ?
आणि आपण प्रवासी
त्या वाटेवरचे कधी सुखाचा उतार
तर कधी दु:खाची चढण
थोडी कमी जास्त
पण प्रत्येकाच्या वाट्याला येणारी
अगदी न चुकता,
हा प्रवास कधीही न संपणारा संपतो
फक्त मृत्यूच्या दारात,
मग हा खटाटोप कशासाठी
सुखाची हिरवळ शोधण्यासाठीच ना,
पण सुख तर एक मृगजळ,
कधीही हाती न येणारे
आणि या मृगजळाचे बनलेच पाणी
तर कधीही तृप्त न होणारे
मग सुख म्हणजे तरी काय,
जे दु:ख नाही तेच तर ना
ज्याचे अस्तित्व पाण्याच्या बुडबुड्यासारखं,
क्षणिक मिळवू का आपण कधी सुख ?
जर असाच पाठलाग करत राहिलो
तर पाहूया ना प्रत्येक दु:खाला आपलसं करुन,
पाहूया ना प्रत्येक दु:खाला सहानुभूतीने
नक्कीच सापडेल त्यांत आपलं सुख
शेवटी मानल तरच सुख ना ? ?
No comments:
Post a Comment